Lakhpati Didi Yojana: महिलांना लखपती दीदी योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये! पैसे होईल थेट खात्यावर जमा

Lakhpati Didi Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार संपूर्ण भारतातील महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. आता पुन्हा सरकारने बचत गटातील महिलांसाठी लखपती दीदी योजना चालू केली आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात अनेकदा या योजनेचा उल्लेख केला आहे. या योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध प्रकारच्या आर्थिक सहायता, आर्थिक साक्षरता तसेच विविध प्रकारची प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे हा योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.

Lakhpati Didi Yojana
Lakhpati Didi Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Women Schemes: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कित्येकदा आपल्या भाषणांमध्ये महिलांकरिता राबविण्यात आलेल्या लखपती दीदी योजनेचा उल्लेख केलेला आहे. या शासकीय योजनेचे फायदे अनेक आहेत. Lakhpati Didi Yojana लाँच होताना लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अगदी पूर्णपणे व्याज मुक्त असे कर्ज दिले जात आहे आणि हे कर्ज एक लाखांपासून पाच लाखांपर्यंतचे आहे (government scheme). महिलांसाठी या योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सकारात्मक दृष्टीकोन बाळगून ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाची अट निश्चित केली आहे ती अट म्हणजे कर्ज फक्त आणि फक्त बचत गटामधील सदस्यांनाच मिळेल.

मोदी सरकारची Lakhpati Didi Yojana

गतवर्षी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या महिलांच्या संख्येचे उद्दिष्ट या ठिकाणी दोन कोटी इतके ठेवले होते. परंतु यंदाच्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः या योजनेची लोकप्रियता पाहिली आणि दोन कोटींवर तीन कोटी इतकी संख्या निश्चित केली. स्त्रियांमुळे किंवा कुटुंबाचे एकूण जे काही उत्पन्न असेल ते लाखांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. या योजनेला लखपती दीदी असेच नाव दिले आहे.

बचत गट म्हणजे काय?

बचत गट म्हणजे असे छोटे गट ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या महिला आहेत. पैसे वाचवण्याकरिता तसेच एकमेकांना कर्ज देण्याकरिता या महिला पूर्णपणे एकत्र येतात. डिसेंबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान च्या माध्यमातून अहवाल देऊनच भारत देशामध्ये अंदाजे 100 दशलक्ष इतक्या महिला सदस्यांसह 90 लाख SHG असल्याचा नमूद केला गेला आहे (sarkari yojana). तसे बघायला गेले तर 1970 च्या दशकामध्ये भारत देशातील काही ग्रामीण विभागात बचत गटाची सुरुवात केली होती यामध्ये सेल्फ एम्प्लॉईड वुमन्स असोसिएशन याचे सुरुवात गुजरातमध्ये सर्वाधिक झाली.

काय आहे Lakhpati Didi Yojana?

केंद्रामधील मोदी सरकारची ही जी काही Lakhpati Didi Yojana आहे ती प्रत्यक्षामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण स्कीमच आहे. विशेष भाग म्हणजे महिलांकरिता सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये सरकार महिलांकरिता कौशल्य प्रशिक्षण देऊनच स्वयंरोजगारासाठी पात्र बनवत असते जेणे करूनच त्यांचे आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे सुधारेल. या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रांमधील व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. जे स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून आयोजित केली आहे.

महिलांना बळ देण्याचा उद्दिष्ट बाळगूनच सुरू करण्यात आलेला या उपक्रमांमध्ये कौशल्य प्रशिक्षण सोबतच महिलांकरिता प्रशासनाच्या माध्यमातून भरीव अशी आर्थिक मदत मिळत आहे. होय सरकारने Lakhpati Didi Yojana च्या माध्यमातून महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्याकरिता एक लाखांपासून पाच लाखांपर्यंतची आर्थिक मदत देण्याचे निश्चित केले आहे.

लखपती दीदी योजनेत मोठा फायदा

लखपती दीदी योजनेमध्ये व्यवसाय सुरू करण्याकरिता महिलांना या ठिकाणी सर्वात प्रथम प्रशिक्षण दिले जात आहे व मार्गदर्शन सुद्धा दिले जात आहे. यासोबतच व्यवसाय सुरू करण्यापासून ते जे काही बाजारपेठ असेल त्यापर्यंत पोहोचवायला मदत सुद्धा केली जात आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्याकरिता महिलांना बिनव्याजी कर्ज सोबतच कमी खर्चामध्ये विमा सुविधेची तरतूद देखील केली आहे. महिलांना कमाईसोबतच बचत करण्यासाठी मोठे प्रोत्साहन दिले जात आहे.

लखपती दीदी योजनेअंतर्गत मिळते 5 लाखांचे बिनव्याजी कर्ज

18 ते 50 वयोगटातील कोणत्याही महिला प्रशासनाच्या या लखपती दीदी योजनेचा लाभ अगदी बिनधास्तपणे घेऊ शकतात. यासाठी आपण बघितले तर महिलेने राज्यभरातील मूळ रहिवासी असणे, या सोबतच बचत गटांमध्ये सहभागी होणे हे पूर्णपणे बंधनकारक आहे व यामध्ये आवश्यक कागदपत्रे तसेच व्यवसाय योजना तुमच्या प्रादेशिक स्वयंसहाय्यता बचत गट कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाचे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुनरावलोकन केले जाईल आणि कर्जाबद्दल तुम्हाला संपर्क साधून माहिती दिली जाईल. अर्ज करत असताना आपल्याला काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे लागतील त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पादनाचा दाखला, अर्जदाराचा वैद्य मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी लागतील.